← Back to भक्तीगीते

पसायदान

✍️ By संत ज्ञानेश्वर

💡 Significance

हे पसायदान ज्ञानेश्वरीच्या शेवटी येते आणि जागतिक शांतता व कल्याणासाठीची ही एक सर्वश्रेष्ठ प्रार्थना मानली जाते.

आता विश्वात्मके देवे । येणे वाग्यज्ञे तोषावे । तोषोनि मज द्यावे । पसायदान हे ॥१॥ जे खळांची व्यंकटी सांडो । तया सत्कर्मी रती वाढो । भूतां परस्परे पडो । मैत्र जीवांचे ॥२॥ दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो । जो जे वांच्छिल तो ते लाहो । प्राणिजात ॥३॥ वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी । अनवरत भूमंडळी । भेटतु भूतां ॥४॥ चला कल्पतरूंचे आरव । चेतना चिंतामणींचे गाव । बोलते जे अर्णव । पीयूषाचे ॥५॥ चंद्रमे जे अलांछन । मार्तंड जे तापहीन । ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ॥६॥ किंबहुना सर्व सुखी । पूर्ण होऊनि तिन्ही लोकी । भजिजो आदिपुरुखी । अखंडित ॥७॥ आणि ग्रंथोपजीविये । विशेषी लोकी इये । दृष्टादृष्ट विजये । होआवे जी ॥८॥ येथ म्हणे श्रीविश्वेशरावो । हा होईल दानपसावो । येणे वरे ज्ञानदेवो । सुखिया जाला ॥९॥

📖 Meaning / Translation

संत ज्ञानेश्वर महाराज विश्वाच्या कल्याणासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतात की, दुष्टांची बुद्धी पालटो, सर्वांना सन्मार्ग लाभो आणि संपूर्ण सृष्टीमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होवो.